भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होते?www.marathihelp.com

प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या.

प्रतिभा देवीसिंह पाटील (डिसेंबर १९, इ.स. १९३४ - हयात) या भारतीय प्रजासत्ताकाच्या १२ व्या राष्ट्रपती होत्या. त्यांनी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या कार्यकाळानंतर जुलै २५, इ.स. २००७ रोजी राष्ट्रपतीपदाची जबाबदारी स्वीकारली. भारताच्या राष्ट्रपतीपदावर नेमल्या गेलेल्या त्या पहिल्या महिला होत्या.प्रतिभाताईंनी आपल्या जीवनाची सुरुवात समाजकार्याने केली व नंतर गांधीवादी विचारामुळे सक्रीय राजकारणात सहभागी झाल्या, अशा त्या ठराविक राजकिय व्यक्तींपैकी आहेत. त्यांचा राष्ट्रपती पदाचा कार्यकाळ इतर राष्ट्रपतींच्या तुलनेने नित्कृष्ट दर्जाचा आणि स्वप्रेमासाठी कार्यरत असा कुप्रसिद्ध आहे. त्यांच्या समाजकार्यात प्रारंभी काळात त्यांनी गरीब व निराधार महिलांसाठी महाराष्ट्रात वसतिगृहे काढली होती ही त्यांची खूप जमेची बाजू आहे. तसेच याचबरोबर राष्ट्रपती पदाच्या कार्यकाळात कुंटूंबियांसह जगभरात भ्रमंती करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. राष्ट्रपतींना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या घरासाठी ज्याची कमाल मर्यादा २००० वर्ग फुट असते त्यात पाटील यांनी सैनिकांसाठी आरक्षित पुणे येथील २ लक्ष वर्ग फुट जागा घेतली, यावर टिका झाल्यानंतर मात्र त्या ६००० वर्ग फुटावर बंगला बांधत आहे.

राष्ट्रपती होण्यापूर्वी त्या राजस्थानच्या १६व्या राज्यपाल व प्रथम महिला राजस्थान राज्यपाल होत्या. तत्पूर्वी त्या राज्यसभेच्या उपसभापती व इ.स. १९६२ ते इ.स. १९८५ दरम्यान महाराष्ट्राच्या विधानसभेत आमदार व विविध खाताच्या मंत्री होत्या.

राजनैतिक जीवन :
१. १९६७ पासून ते १९८५ पर्यंत प्रतिभा पाटील मुक्ताईनगर तालुक्याच्या आमदार राहून त्यांनी मुक्ताईनगर(तेव्हाचे एदलाबाद)चे प्रतिनिधित्व महाराष्ट्र विधानसभेत केले. नंतर पाटील या अमरावतीतून भारतीय लोकसभेत खासदार राहिल्या. प्रतिभा पाटील राजस्थानच्या गव्हर्नर सुद्धा राहिल्या

२००७ मध्ये त्यांची भारताच्या राष्ट्रपदी निवड झाली. त्या भारताच्या इतिहासातील प्रथम महिला राष्ट्रपती बनल्या.

२.प्रतिभाताई पाटील या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत की ज्यांनी एकही निवडणूक हरली नाही. तसेच त्या जगातील एकमेव महिला राष्ट्रपती आहेत कि ज्यांनी आपल्या राष्ट्रपती कार्यकाळात एक सुखोई सारखे लढाऊ विमान चालवले, ते पण वयाच्या 74 व्या वर्षी. जगातील एकमेव महिला राष्ट्रपती ज्यांनी आपल्या देशाची संस्कृती जपत कुठल्याही प्रकारे राजशिष्टाचार तोडला नाही, एवढ्या त्या आपल्या भारत देशाच्या संस्कृतीचा आदर करत होत्या व करतात.[ संदर्भ हवा ]
३.इ.स. १९६२ साली त्या जळगाव विधानसभा मतदार संघातून निवडून आल्या. त्यांची एस.टी. महामंडळाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली. ७ जुलै १९६५ला त्यांनी लग्न करून अमरावतीच्या शेखावतांच्या घरात प्रवेश केला व पहिल्यांदाच मंत्री झाल्या. त्यानंतर पुढे सतत वीस वर्षे त्या निरनिराळ्या खात्यांच्या मंत्री होत्या. आरोग्य, पर्यटन, संसदीय कामकाज, गृहनिर्माण, समाजकल्याण व सांस्कृतिक, सार्वजनिक आरोग्य व समाजकल्याण, दारुबंदी व पुनर्वसन, शिक्षणमंत्री, विधान सभेवर फेरनिवड, विधान मंडळ नेतेपदी निवड वगैरे. १९७९ ते ८० या काळात विधानसभेत विरोधी पक्षनेत्या म्हणूनही त्यांनी काम पाहिले.

इ.स. १९८५ साली त्या राज्यसभेवर निवडून गेल्या व राज्यसभेच्या उपाध्यक्षा झाल्या. तो त्यांचा कार्यकाल संपल्यावर अमरावतीहून १९९१ साली प्रथमच त्या लोकसभा सदस्य म्हणून निवडून गेल्या. १९८९मध्ये त्या मध्यप्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षाही होत्या. १९७८ला मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) मतदार संघातून त्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून निवडून आल्या.

नैरोबीत आंतरराष्ट्रीय समाजकल्याण परिषदेस भारत सरकारच्या प्रतिनिधी म्हणून त्या गेल्या होत्या. प्रिटोरिया येथील महिला परिषद, म्युनिक येथील महिलांची जागतिक परिषद, तसेच १९८५ मध्ये दक्षिण अमेरिकेत बोलेव्हिया येथे झालेली परिषद, अशा सर्व ठिकाणी त्यांनी देशाचे प्रतिनिधित्व केले.

त्यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ स्थापून स्त्रियांना चरितार्थाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. पाळणाघर मदत योजना स्थापन केली. महिला बँकांची स्थापना केली. आदिवासी विकास योजना,वसंतराव नाईक महामंडळ, अण्णाभाऊ साठे महामंडळ आणि ज्योतिबा फुले महामंडळ इ. महामंडळांची स्थापना केली. जळगाव येथे एक सुसज्ज रुग्णालय उपलब्ध करून दिले. अंधांसाठी संस्था काढून कार्य उभे केले. जळगाव येथे इंजिनियरिंग कॉलेज काढले

solved 5
General Knowledge Monday 10th Oct 2022 : 16:58 ( 1 year ago) 5 Answer 150 +22