Login
Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Morbi adipiscing gravdio, sit amet suscipit risus ultrices eu. Fusce viverra neque at purus laoreet consequa. Vivamus vulputate posuere nisl quis consequat.
Create an accountLost your password? Please enter your username and email address. You will receive a link to create a new password via email.
अनेक शक्ती आपल्या नैसर्गिक जलस्रोतांवर गंभीरपणे परिणाम करत आहेत. यापैकी बरेचसे प्रामुख्याने मानवी कृतींचे परिणाम आहेत आणि त्यामध्ये इकोसिस्टम आणि लँडस्केप बदल, अवसादन, प्रदूषण, अति-अमूर्तता आणि हवामान बदल यांचा समावेश आहे.
सजीवांना अपायकारक किंवा विषारी असे पदार्थ पर्यावरणात मिसळण्याची प्रक्रिया म्हणजे पर्यावरणीय प्रदूषण. पर्यावरणातील हवा, जल व मृदा अशा घटकांमध्ये अपायकारक पदार्थ मिसळल्याने पर्यावरण दूषित बनते. प्रदूषणाची तीव्रता वाढल्यास अशी पर्यावरण स्थिती सजीवांना अपायकारक बनते. प्रदूषण बहुतकरून मानवी कृतींमुळे घडून येते.
ऐतिहासिक काळापासून हवेतील प्रदूषण आणि मानवी संस्कृती यांचा परस्परांशी संबंध आहे. इतिहासपूर्व काळात मानवाला अग्नीचा शोध लागल्यानंतर त्याने अग्नीचा वापर सुरू केला आणि तेव्हापासून प्रदूषणाला सुरुवात झाली असे म्हणता येईल. प्राचीन गुहांच्या छतांवर आढळलेले काजळीचे थर याची साक्ष देतात. त्यानंतर मानवाने धातू वितळविण्यास सुरुवात केली आणि त्यामुळे बाहेरील हवेच्या प्रदूषणात लक्षणीय वाढ झाली. तेव्हापासून प्रदूषणात निरंतरपणे वाढ होत राहिली आहे. जगातील मोठमोठ्या शहरांमध्ये लोकसंख्या वाढल्याने लाकूड व दगडी कोळसा यांचा इंधन म्हणून वापर वाढला. तसेच वाहतुकीसाठी घोड्यांचा होत असलेला वापर यांमुळे शहरे प्रदूषणमय व ओंगळ झाली. औद्योगिक वाढीमुळे असंस्कारित रसायने व अपघटके स्थानिक जलप्रवाहात सोडली जाऊ लागली. अणुविज्ञानाच्या विकासानंतर अणुतंत्रज्ञानावर आधारित संयंत्रे विकसित झाली आणि त्याबरोबर किरणोत्सारी प्रदूषके वातावरणात मिसळण्यास सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर अणुचाचण्या आणि अण्वस्त्रांच्या परिणामांचे अहवाल ज्ञात झाल्यानंतर प्रदूषणाची तीव्रता लोकांना लक्षात येऊ लागली. मागील काही दशकांत आंतरराष्ट्रीय आपत्ती ठरणाऱ्या तेलगळतीच्या व वायुगळतीच्या घटना घडल्यामुळे लोक सजग झाले आहेत.